गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे व येथील धान (भात) गिरण्यांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोंदिया शहर म्हणूनच ‘तांदूळाचे शहर’ असे ओळखले जाते. सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ जिल्ह्यातून मध्यपूर्वेतील देशांना निर्यातही केला जातो. हा जिल्हा अर्थातच शेतीप्रधान आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७० ते ७५% लोकसं‘या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे व जलसिंचनाच्या सोयीही आहेत. त्यामुळेच भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातासह तूर व उडीद ही पीके खरीप हंगामात घेतली जातात. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, जवस व हरभरा ही पिके प्रामुख्याने जिल्ह्यात घेतली जातात.
जिल्ह्यातील तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती उत्तम चालते. इटियाडोह (तालुका-अर्जुनी मोरगाव) व आंभोरा (तालुका - गोंदिया) येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे कार्य करतात. तसेच जिल्ह्यात काही प्रमाणात ऊसही घेतला जातो. वैनगंगा सहकारी साखर कारखाना तिरोडा तालुक्यात माडगी येथे आहे.
जिल्ह्यातील तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती उत्तम चालते. इटियाडोह (तालुका-अर्जुनी मोरगाव) व आंभोरा (तालुका - गोंदिया) येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे कार्य करतात. तसेच जिल्ह्यात काही प्रमाणात ऊसही घेतला जातो. वैनगंगा सहकारी साखर कारखाना तिरोडा तालुक्यात माडगी येथे आहे.