भौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा महाराष्ट्राला मध्य प्रदेश (बालाघाट जिल्हा) व छत्तीसगड (राजनंदनगाव जिल्हा) या राज्यांना जोडतो. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याचा प्रदेश आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे आहेत.
प्रमुख नदी ही वैनगंगा असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमाप्रदेशातून वाहते. बाघ ही तिची प्रमुख उपनदी असून, ईशान्य सीमाभागातून वाहते. याशिवाय बावनथडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या वैनगंगेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.
डोंगराळ प्रदेश, विषम हवामान, विविध प्रकारची जमीन (माती), अनेक नद्यांनी व जैवविविधतेने समृद्ध असणारा हा गोंदिया जिल्हा आपणास निसर्गाची अनेक रूपे दाखवितो. जिल्ह्यात नवेगाव बांध हा जिल्ह्यातील तलावांपैकी सर्वाधिक मोठा तलाव आहे. या तलावासह माजागड, रेंगोपार, चूलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच जलसिंचनाचेही कार्य साधतात. अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील, गाढवी नदीवरील इटियाडोह प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प (धरण) आहे. याची क्षमता सुमारे ३१८ क्यु. मी. आहे. जिल्ह्यात शिरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगढ, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत.
खनिज संपत्तिच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनेडियम ही खनिजे सापडतात.
लोकसंख्या : संदर्भ - जनगणना २००१
लोकसंख्येच्या तपशिलावरून हा जिल्हा कमी नागरीकरण झाल्याचे दिसते. ग्रामीण जिल्हा’ (म्हणजे मागासलेला नव्हे) हेच याचे वैशिष्ट्य आहे. तसेच दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे जास्त असलेले प्रमाण हीदेखील एक लक्षणीय बाब आहे.
प्रमुख नदी ही वैनगंगा असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमाप्रदेशातून वाहते. बाघ ही तिची प्रमुख उपनदी असून, ईशान्य सीमाभागातून वाहते. याशिवाय बावनथडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या वैनगंगेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.
डोंगराळ प्रदेश, विषम हवामान, विविध प्रकारची जमीन (माती), अनेक नद्यांनी व जैवविविधतेने समृद्ध असणारा हा गोंदिया जिल्हा आपणास निसर्गाची अनेक रूपे दाखवितो. जिल्ह्यात नवेगाव बांध हा जिल्ह्यातील तलावांपैकी सर्वाधिक मोठा तलाव आहे. या तलावासह माजागड, रेंगोपार, चूलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच जलसिंचनाचेही कार्य साधतात. अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील, गाढवी नदीवरील इटियाडोह प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प (धरण) आहे. याची क्षमता सुमारे ३१८ क्यु. मी. आहे. जिल्ह्यात शिरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगढ, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत.
खनिज संपत्तिच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनेडियम ही खनिजे सापडतात.
लोकसंख्या : संदर्भ - जनगणना २००१
लोकसंख्येच्या तपशिलावरून हा जिल्हा कमी नागरीकरण झाल्याचे दिसते. ग्रामीण जिल्हा’ (म्हणजे मागासलेला नव्हे) हेच याचे वैशिष्ट्य आहे. तसेच दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे जास्त असलेले प्रमाण हीदेखील एक लक्षणीय बाब आहे.
No comments:
Post a Comment